महाराष्ट्रातून ४ जवान शहीद

सोमवार, 19 सप्टेंबर 2016 (17:07 IST)
भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांची संख्या वाढली असून १८ जवान शहीद झाले आहेत.

या हल्ल्यात जखमी झालेले यवतमाळमधील विकास जनार्दन कुळमेथे यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आता महारष्ट्रातील शहीद झालेल्या जवानांची संख्या चार झाली आहे. 

वेबदुनिया वर वाचा