मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि त्या समाजात अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असं आमच्या सरकारचे स्पष्ट मत असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केली आहे.
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. स्वंतत्र्य भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मोर्चे निघाले आहेत. या मोर्चांचे स्वरुप मुक असले, तरी त्याचा आवाज मोठा आहे. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे आम्ही मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.
फक्त मोर्चे काढून होणार नाही तर सरकार सोबत येऊन आयोजकांनी चर्चा करणे गरजेचे आहे. द्ब्सव तयार करायचा आणि निर्णय घेतेवेळी वेळ नाही द्यायचा असे होऊ न देता आयोजकांना भिजत घोंगडं ठेवू नका, असे आवाहन करतानाच, राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. त्यासाठी निर्णायक निर्णय घेण्याची सरकारची तयारी आहे. या निर्णयासाठी आम्हाला चर्चा करायची आहे. कारण थेट निर्णय जाहीर करता येत नाही. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन चर्चा करावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.