मागील आठवडय़ापासून नगरपरिषदेचवतीने अतिक्रमण काढण्याची सूचना केली जात आहे. याला व्यापार्यांनी दाद न दिल्यामुळे सोमवारी भर पावसात व्यापार्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. मुख्यधिकारी बापट यांच्यासह शहर पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, वाहतूक पोलीस निरीक्षक नीलेश गोपाळचावडीकर, नगरअभिंता दिनेश शास्त्री यांनी विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, शिवाजी चौक आदी भागात मोठय़ा फौजफाटय़ासह अतिक्रमण काढले. पावसासाठी दुकानावर बांधण्यात आलेली पानसरे देखील काढल्यामुळे व्यापार्यांनी नाराजी व्यक्त केली.