पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध होता. या कार्यक्रमाचे आयोजक व माजी भाजपा नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शिवसैनिकांनी शाई फेकली होती. यावर मत व्यक्त करताना ठाकरे यांनी लिहले आहे की, पाकची चमचेगिरी करणाºयांचे तोंड राष्ट्रभक्त जनतेने काळे केले व त्यासाठी जनता टाळ्याही वाजवत आहे. सुधींद्र कुलकर्णी यांच्या आरोपानुसार हा हल्ला शिवसैनिकांनी केला. त्यांच्या आरोपांशी आम्ही सहमत असून देशनिष्ठा आणि देशाचे संरक्षण करणे हा महाराष्ट्राचा धंदा असून शिवसेना हा धंदा इमानेइतबारे करत आहे असे उद्धव ठाकरेंनी नमूद केले.