आशिष शेलार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावर उपस्थित केलेल्या मुद्दयावर चर्चा होत असताना या विषय उजेडात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेनेच्या हातचा परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा मुद्दा हिसकावून घेण्याकरिता भाजपाने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.