तावडे यांनी शाळेसाठी सुरक्षा उपकरणाच्या खरेदीसाठी कंत्राट न काढता हा ठेका दिला, जेव्हाकी वित्त विभागाने यावर आपली आपत्ती दर्शविली होती. यात प्रत्येक शाळेत अग्निरोधक यंत्र बसवले जाणार होते व हे काम ठाण्यातील कंपनीला देण्यात आले होते. यात प्रत्येक शाळेत तीन अग्निरोधक यंत्र बसवले जाणार होते. विशेष म्हणजे अर्थखात्याच्या परवानगीविनाच हे कंत्राट देण्यात आले.
दरम्यान विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. हा घोटाळा नसून आम्ही पूर्वीच्या सरकारने राबववेल्या प्रक्रियेचे पालन केले, मात्र अर्थखात्यातील वरिष्ठ अधिका-यांनी या प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्याने आम्ही प्रक्रिया थांबवली, यात सरकारचा एकही पैसा खर्च झालेला नाही अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे.