चंदनवाडीत रविवारी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राणेंनी ही टीका केली. अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवणार्या केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्यांची घोर फसवणूक केली आहे. या सर्व घडामोडींचा फायदा कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.