मुंबई। नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसाठी गुरूवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरवात झाली.
औरंगाबाद महापालिकेसाठी 65 टक्के आणि नवी मुंबईत 51 टक्के मतदान झाले. दोन्ही महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती आहे. कुणाचे भाग्य उजळते ते मतमोजणीनंतरच कळेल. दरम्यान, शिवसेनेच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. इतर निकाल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.