मुंबई- मुंबईत दहीहंडीचा उत्सव साजरा करताना गोविंदा पथकांनी न्यायालयाने दिलेल्या 20 फुटांवर दहीहंडी फोडण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गोविंदा पथकाने नऊ थर रचले असले तरी, नऊ थर रचून हंडी फोडली नसल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार कसा, असा सवाल मनसे अध्क्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.