...तर ढाण्या वाघाकडून काँग्रेस-राष्ट्रवादीची राख!

शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016 (09:45 IST)
आठवले आहेत बाबासाहेबांचा ढाण्या वाघ, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्यांच्या वाटेला गेले त्यांची झाली राख! अशी कविता पेरतच मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आणि सभागृहात एकच हशा पिकला. निमित्त होते... रिपाइं नेते रामदास आठवले यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपद मिळाल्याने आयोजित सत्कार सोहळ्याचे. षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या सोहळ्यास महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे उपस्थित होते. 
 
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका केली. ते म्हणाले, कोपर्डी बलात्कार प्रकरण हे दुदैवीच आहे. यातील दोषींना शिक्षा आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी सरकार सतर्क आहे. पण, त्यानंतर काढण्यात आलेल्या मोर्चातून राजकीय पोळी भाजण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न होता. अशा घटनांमधून समाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न काही नेते करत आहेत, हे चुकीचे आहे. 

वेबदुनिया वर वाचा