जोरदार पावसामुळे महाराष्ट्र चिंब

सोमवार, 22 जून 2015 (10:08 IST)
मान्सून राज्यात होऊनही दडी मारलेल्या पावसाने आता संपूर्ण राज्याला व्यापले असून मुंबईपासून कोकणासह गोव्यास मुसळधार पाऊस पडत आहे.

पुणे-मुंबईत सलग दोन दिवस संततधार सुरु असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मान्सूनने जोरदार आगेकूच सुरूच ठेवली असून येत्या २४ तासांत विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातही अतिवृष्टी होईल, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे़  मुंबईसह विदर्भ, मराठवाड्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूरात पावसाला सुरुवात झाली आणि रविवार दिवसभरानंतर आज सोमवारी सकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरु आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अद्यापही जोरदार पाऊस सुरु आहे.

वेबदुनिया वर वाचा