राज्यातील घोटाळेबाज सरकारला हाकलून लावा, आम्ही राज्याचा विकास करू, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हमीदवाडा (ता. कागल) येथे गुरुवारी केले.
राधानगरी मतदारसंघातून उमेदवारी इच्छुक असलेले प्रकाश आबीटकर, कागलमधून इच्छुक असलेले संजय घाटगे यांनी त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे म्हणाले, सूर्याजी पिसाळ अनेक जण आहेत. सूर्याजी पिसाळ जिथे-जिथे उभे राहतील तिथे त्यांना पाडा. राज्यातील सरकार घोटाळेबाज सरकार आहे.