राज्य सरकार कोकणी माणसावर अन्याय करत आहे. स्वाभिमानचे कार्यकर्ते 4 सप्टेंबरपर्यंत खालापूर, लोणावळा या टोलनाक्यांपासून कोल्हापूरपर्यंत उभे राहून कोकणात जाणाऱ्या वाहनांना विनाटोल पाठवणार आहेत. यामुळे तरी राज्य सरकारला जाग येईल आणि टोलमुक्तीसाठी पुढाकार घेईल, असे नितेश राणे म्हणाले विनाटोलसाठी तुमच्या गाडीवर फक्त कोकणात जात असल्याचं पोस्टर किंवा स्टिकर लावलेलं पाहिजे, असे राणे यांनी सांगितलं.