विधिमंडळाचे अधिवेशन ८ आठ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. नागपुरात झालेल्या बैठकीत कॉंग्रेसने शेतकºयांसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर पुण्यात पत्रकारांशी बोलताना ‘स्वाभिमानी’चे नेते शेट्टी यांनी याच मुद्यावर आंदोलनाचा इशारा दिला. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकर्यांना दुष्काळामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने त्वरित पॅकेज जाहीर करावे, अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.