यावेळी गुन्हा दाखल केलेल्या मध्ये उद्धव ठाकरेंसह ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, मुद्रक आणि प्रकाशक राजेंद्र भागवत, जिल्हा वितरक यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंडविधान कलम 153 अ, 292, 505, 500 आणि 109 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
प्रभुदेसाईंकडून दिलगिरी
कार्टूनप्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणत्याही समाजाचा भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील ती मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ‘सामना’तून व्यंगचित्र वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.आज हे दिलगिरीचे निर्णय सामनाने पहिल्या पानावर छापल्या आहेत.