एनडीआरएफच्या तुकडीचं बचावकार्य

गुरूवार, 4 ऑगस्ट 2016 (15:35 IST)
नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्यात आल्यानं या पुरात जवळपास ४० जण  अडकलेत. यानंतर एनडीआरएफच्या 25 जवानांच्या तुकडीचं सकाळपासून बचावकार्य सुरु झालं आहे. शिंदे वस्तीतून 17 जणांना पुरातून बाहेर काढण्यात आलं आहे.

वगावातील 50 ते 60 घर पाण्याखाली आहेत. 50 कुटुंब आणि 250 नागरिकांना वारी जिल्हा परीषद शाळेत हलवण्यात आलं आहे. 12 गावातील 3 हजार लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. वैजापूर तालुक्यातील 12 गावांना पाण्याचा वेढा पडला असून त्यांचा संपर्क तुटला आहे. तसेच वैजापूर-श्रीरामपूर महामार्ग पाण्याखाली गेला आहे. पाण्यात शिंदे वस्ती, सरलाबेट आणि सय्यद वस्ती  मिळून 400 लोक अडकले आहेत.

वेबदुनिया वर वाचा