मोबाईल फोनची बिले भरायला पैसे आहेत, मग वीजबिले का भरता येत नाहीत, असा बोचरा सवाल महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी केला होता. त्यावरून नितेश राणेंनी खडसेंचा समाचार घेतला आहे.
आमदार राणे म्हणाले, सत्तेत आल्यावर भाषा कशी बदलते याचे उदाहरण एकनाथ खडसे यांनी दाखवून दिले आहे. राज्यातील जनतेने याचा विचार करावा, असा सल्लाही नितेश राणे यांनी दिला आहे.
याशिवाय, नितेश राणे यांनी शिवसेनेवरही प्रहार केला आहे. राणे म्हणाले, शिवसेना सत्तेत आहे की विरोधात, हे त्यांनाच अजून माहित नाही. शिवसेना विरोधात बसला तरी विरोधी पक्ष हा भाजपच्या हातचा रिमोट कंट्रोल असेल, अशी घणाघाती टीका राणे यांनी केली आहे.