यावेळी बोलताना देसाई म्हणाल्या, शनि चौथ-यावर प्रवेश मिळणे ही फक्त सुरूवात आहे. आम्ही तीन महिन्यांपूर्वी संघर्ष सुरू केला आणि महिला शक्तीचा विजय झाला. महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात प्रवेश मिळावा म्हणून १३ एप्रिलपासून आंदोलन करणार आहोत. ज्या ज्या मंदिरात महिलांना केवळ महिला आहेत म्हणून प्रवेश नाकारला जाईल, तेथे आमचा लढा सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले.