एकाच कुटुंबातील चार लहान मुलांचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील झोलंबा गावात घडली. एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
या मृत व्यक्तीच्या तिसर्या दिवसाच्या कार्याचे जेवण झाल्यावर घरातील लहान मुलांना त्रास सुरु झाला. यातील चौघा मुलांचा मृत्यू झाला तर तीन वर्षाच्या एका मुलीची प्रकृती खालावली. विषबाधा नेमकी कशातून झाली याचा तपास सुरु आहे.