"जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला मृतदेह होते... मी घाबरलो. मी उभा राहिलो आणि पळू लागलो..." असे ४० वर्षीय विश्वास कुमार रमेश म्हणाले. गुरुवारी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघातात रमेश चमत्कारिक ठरला. तो या मृत्यूच्या दृश्यातून वाचला. लंडनला जाणाऱ्या विमानातील २४२ लोकांपैकी तो एकमेव आहे जो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
विश्वासने सांगितले की, टेकऑफ झाल्यानंतर सुमारे ३० सेकंदांनी मोठा आवाज झाला आणि त्यानंतर विमान जमिनीवर आदळले. त्याने सांगितले की, सर्व काही इतक्या वेगाने घडले की त्याला समजण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या छातीत, डोळ्यांत आणि पायात गंभीर दुखापत झाली आहे. पण तो अजूनही शुद्धीवर आहे आणि बोलू शकतो. पोलिसांनी माहिती दिली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील घटनास्थळी दाखल झाले त्यांनतर त्यांनी रुग्णालयात जाऊन विश्वास कुमार रमेश यांची भेट घेतली व विचारपूस केली.