कोइम्बतूर येथील एका सभेला संबोधित करताना गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेच्या सीमांकनावर सांगितले की, तामिळनाडूसह कोणत्याही दक्षिणेकडील राज्यात संसदीय प्रतिनिधित्व कमी केले जाणार नाही. ते म्हणाले की, मोदी सरकारने लोकसभेत स्पष्ट केले आहे की सीमांकनानंतर दक्षिणेकडील कोणतेही राज्य एकही जागा गमावणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी दावा केला होता की तामिळनाडूसह दक्षिणेकडील राज्यांना लोकसभेतील जागा गमावण्याचा धोका आहे. रॅलीत द्रमुकवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, तामिळनाडूसोबत अन्याय होत असल्याच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्याला ५,०८,३३७ कोटी रुपये दिले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही अमित शहा यांनी द्रमुक सरकारवर टीका केली.