आंतरराष्ट्रीय स्तरावर बैठका घेवून पाकिस्तानावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्रीयमंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंग, मोहन परळीकर यांनी डीजीएमओ स्तरावर बैठका घेवून पकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच पाकिस्तानने लष्कराने त्याला वाघा बॉर्डरवर सोडून त्यांची सुटका केली असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले. आता चंदु लष्कराचा जवान असल्याने चौकशी व कागदोपत्री पुर्तता झाल्यानंतरच तो गावाकडे परतणार असल्याचेही डॉ.भामरे यांनी सांगितले.