मिळालेल्या माहितीनुसार सिंगापूरमधील ब्लूमबर्ग टीव्हीला संरक्षण प्रमुखांनी (सीडीएस) दिलेल्या मुलाखतीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीदरम्यान सीडीएसना विचारण्यात आले की भारत-पाक संघर्षादरम्यान पाकिस्तानने भारताचे कोणतेही जेट विमान पाडले होते का? यावर सीडीएसने दिलेल्या उत्तरावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप करत त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लिहिले की सीडीएसने दिलेल्या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उद्भवतात, जे विचारले पाहिजेत. संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ बोलावले तरच या प्रश्नांवर चर्चा शक्य आहे, असे ते म्हणाले. मोदी सरकारने देशाची दिशाभूल केली आहे असा आरोप खरगे यांनी केला.