माझा जन्म ज्या सिंध प्रांतात झाला तो आज भारतात नाही याचे मला अजूनही वाईट वाटते, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. मी कोणत्याही देशाचे थेट नाव घेणार नाही. पण आशियातील बरेच देश असे आहेत की ज्यांच्यासोबत भारताचे संबंध सुधारल्यास मला आनंदच होईल असेही ते म्हणाले.