आंध्र प्रदेशातील विजयनगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खरंतर, विजयनगरमध्ये, चार मुले गाडी लॉक झाल्यामुळे त्यात अडकली आणि गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार विजयनगर कॅन्ट परिसरातील द्वारपुडी गावात रविवारी ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, चारही मुले १० वर्षांपेक्षा कमी वयाची होती. हे चौघेही एका गाडीत खेळत होते, त्याच वेळी गाडीचे दरवाजे बंद झाले आणि गुदमरून चौघांचाही मृत्यू झाला. एका मुलाच्या पालकांना त्यांच्या मुलाचा शोध घेत असताना ही घटना कळली.