Chhattisgarh News: छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. ही चकमक बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवर घडली, जिथे सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी ऑपरेशन करत होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चकमक अजूनही सुरू आहे आणि नक्षलवाद्यांविरुद्धची कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी संपूर्ण परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक (DRG) चा एक जवान शहीद झाला, तर सुरक्षा दलांनी आतापर्यंत २२ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. यापैकी १८ जणांचा मृत्यू विजापूरमध्ये आणि ४ जणांचा कांकेर जिल्ह्यात झाला. कांकेरमध्येही चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.