राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र जमिनीखाली पाच किलोमीटर खोलीवर होते. या सौम्य तीव्रतेच्या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तरीही, पहाटेच्या या धक्क्यांमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली.
अचानक झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी अनेक कुटुंबांना सावध केले. फरीदाबादच्या अनेक भागात लोक घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी पळाले. तथापि, भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतेही मोठे नुकसान झाले नाही ही दिलासादायक बाब आहे.