नवी दिल्ली- वाढत्या प्रदुषणाने दिल्लीकरांना श्वास घेणे मुश्किल झाले आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तातडीची बैठक बोलवली होती. येथे तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून केजरीवाल यांनी लोकांना घरात राहण्याचा व शक्यतोर घरातून काम करण्याचा सल्लाही दिला आहे.