स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी अनुष्काची निवड

शहर विकास मंत्रालयाद्वारे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महिला आणि ग्रामीण भागांमध्ये स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व आणि त्याविषयीची जनजागृती करण्यासाठी अनुष्का शर्माची निवड करण्यात आली आहे. अनुष्का स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मुख्य मुद्द्यांवर भाष्य करु शकेल आणि आरोग्यविषयक माहितीसुद्धा लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. 
 
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत योगदान देण्यासाठी अनुष्काने दोन व्हिडिओंचे चित्रिकरणही पूर्ण केले आहे. या व्हिडिओंमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांसाठी शौचालयाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा