पोलिसांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक तरुणी या उपक्रमात उस्फुर्तपणे सहभागी होताना दिसत आहेत. पोलिसांच्या या उपक्रमामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर आळा बसायला मदत होईल. तसेच इतर ठिकाणी वावरताना देखील तरुणीकडे पाहण्याचाच टवाळखोरांचा दृष्टिकोन बदलू शकतो, असा मध्य प्रदेश पोलिसांचा कयास आहे.