कर्नाटक- महाराष्ट्र वाद विकोपाला गेल्यानंतर परस्परातील मतभेद विसरत राज्यातील नेते एक होत आहेत. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत सार्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
दोन तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक वादावर चर्चा झाली असून, एक वकील म्हणून आपण यासाठी लढा देण्यास तयार असल्याचे या भेटीत अंतुले यांनी स्पष्ट केल्याचे समजते. अंतुले कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते असताना त्यांनी बाळासाहेबांची भेट घेतल्याने राज्यात राजकीय चर्चेचे गुर्हाळ सुरू झाले आहे.