केंद्र सरकारचा आगामी एक मोठा निर्णय हाच असणार आहे, तो म्हणजे देशातील श्रीमंताना खरोखरच सबसिडीची आवश्यकता आहे का? देशातील काही गरीब कुटुंबाना सबसिडीची निर्विवाद आवश्यकता आहे, त्यांना सबसिडी द्यायलाच हवी, पण सरसकट सर्वांनाच सबसिडी देण्याची काहीच आवश्यकता नाही, असेही जेटली यांनी म्हटले आहे.