गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या 23 वर पोचली असून, 96 जवानांसह दोन पन्नास लोक जखमी झाले आहेत. या हिंसाचाराचा मोठा फटका अमरनाथ यात्रेला बसला असून, श्रीनगरमध्ये अडकलेल्या यात्रेकरूंना सुरक्षितपणे माघारी आणण्यात आले. यात्रेकरूंची नव्याने एकही तुकडी अमरनाथच्या दिशेने पाठविण्यात आलेली नाही, असे जम्मूचे पोलिस उपायुक्त सिमरनदीप सिंह यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीर खोऱ्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.