सोनई- गुढीपाडव्याला शनी चौथर्यावर कावडीच्या पाण्याचा अभिषेक करण्यास बंदी आणल्यानंतर शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ विरुद्ध गावकरी असा वाद रंगला आहे. विश्वस्त मंडळाच्या या निर्णयाला गावकर्यांनी कडाडून विरोध केला आहे. चौथर्यावर जाऊन शनिमूर्तीला कावडीच्या पाण्याचा अभिषेक करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे. त्यामुळे गावात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी देवस्थान ट्रस्टने पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्याकडे केली.
गुढीपाडव्याच्या दिवशी चौथर्यावर जाऊन कावडीच्या पाण्याचा अभिषेक करण्यास, तसेच श्रवण महिन्यात रोज सकाळी होणार्या जलाभिषेकाची परंपरा यंदा बंद करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला. त्यावरून विश्वस्त मंडळ व गावकर्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.