यंदा पहिल्यांदाच चार खेळाडूंना ‘खेलरत्न’ने गौरवण्यात आले.राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं आज राष्ट्रपती भवनात आयोजित सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी सिंधू, साक्षी, दीपा आणि जीतूला खेलरत्न प्रदान केला. त्याशिवाय यंदा पंधरा खेळाडूंचा अर्जुन पुरस्कारानेही गौरव करण्यात आला.