राहुल गांधींना हायकोर्टाचा झटका

बुधवार, 11 मार्च 2015 (10:34 IST)
महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप भिवंडीतील प्रचारसभेत करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे. या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात संघ स्वयंसेवकांनी दाखल केलेली तक्रार मागे घेण्याबाबत राहुल गांधींनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली.
 
महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता, असा खळबळजनक आरोप राहुल यांनी 6 मार्चला भिवंडीत झालेल्या प्रचारसभेत केला होता. त्याविरोधात संघाचे कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरुद्ध खटला भरला होता.

वेबदुनिया वर वाचा