‘खाट पे चर्चा’ ही कांग्रेसच्या रणनीतीतज्ञ प्रशांत किशोर यांच्या डोक्याची उपज आहे. शेतकर्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला बसण्यासाठी खाटा आणल्या होत्या. मात्र, सभेनंतर खाटा नेण्यासाठी पळापळ सुरू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली.
काँग्रेस पदाधिकार्यांनी सांगितले की, पक्षाने कार्यक्रमासाठी दोन हजार खाटा आणल्या होत्या. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर नागरिकांनी त्या पळविल्या. यावेळी काहींमध्ये वादही निर्माण झाला होता.