सोळाव्या लोकसभेत राहुल गांधी यांचे आज पहिलेच भाषण झाले. यावेळी राहुल गांधी यांनी आक्रमक होत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मोदी सरकारने देशाची निराशा केली आहे. मोदी सरकार शेतकर्यांना दुर्लक्षित करत आहे. मोदींनी शेतकर्यांशी थेट संवाद साधायला हवा. भारतीय जनता पक्ष बोलते एक व दुसरेच करत आहे.’
‘अच्छे दिन’चे आश्वासन देणार्या सरकारने निराशा केली आहे. शेती नुकसानीचे आकडे सरकार वेगवेगळे दाखवत आहे. आकडेवारीतील घोळ पंतप्रधानांनी स्वत: तपासावा व जनतेचे दु:ख स्वत: समजून घ्यावे. कृषी विकासात फक्त 1 टक्क्याची वाढ झाली आहे. देशाची शक्ती ती शेतकरी व कामगारांच्या हातात आहे. सरकार अच्छे दिन नसून सूटबुटांचे सरकार आहे, असे सांगून ते म्हणाले, हे केवळ उद्योगपतींचे सरकार आहे.