गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांचे एक पथकही रांचीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुप्तचर संस्थेच्या अहवालाच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. रकीबुल याचे संबंध परदेशापर्यंत असल्याचा संशय आल्यानंतर एनआयएच्या पथकाला अलर्ट करण्यात आले आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी रकीबुल दिल्लीला गेला होता, असाही संशय व्यक्त केला जात आहे. रकीबुलचे लखनौशी कनेक्शन आहे. लखनौमधील आयडी मित्रा नावाच्या व्यक्तीबरोबर तो चर्चा करायचा. या कनेक्शनची चौकशी दिल्ली पोलिस करणार आहेत.