पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, केंद्रातील मोदी सरकार रायबरेली आणि अमेठी मतदारसंघाला सापत्नभावाची वागणूक देत आहे. सरकारचे कोणतेही प्रकल्प येथे येऊ नयेत, याची काळजी ते घेत आहेत. सोनिया गांधी यांचे आज सकाळी रायबरेलीत आगमन झाले. त्यानंतर त्यांनी विकासकामांबाबत सरकारी अधिकार्यांबरोबर चर्चा करून आढावा घेतला. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री मनोजकुमार पांडे उपस्थित होते.