‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी रक्षाबंधनाबद्दल बोलले हे चांगलेच आहे. पण मग त्यांना ‘रमजान’ का आठवला नाही, त्याबद्दल मोदी काही बोलले का नाही, असा सवाल करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांनी मोदींच्या आवाहनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवादित मुद्द्यांना बगल दिल्यानंतर काँग्रेसने मोदींवर हल्लाबोल केला.