मोदींचे मंत्री 'हवेत': रादेवबाबा

शुक्रवार, 22 मे 2015 (11:34 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्री अहंकारी आहेत अशी टीका च योगगुरु रादेवबाबा यांनी केली आहे. यावर कहर म्हणजे रादेवबाबा यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
एका कार्यक्रानंतर पत्रकारांशी बोलताना रादेवबाबा म्हणाले, निवडणुकीपूर्वी जनिीवर असणारे मोदी सरकारधील मंत्री आता हवेत आहेत.
या सर्वांनी मोबाईल नंबरही बदलले आहेत. याचाच अर्थ त्यांना जनतेची संपर्क नको आहे, असा होतो.
 
दरम्यान, राहुल गांधी यांना काँग्रेसला पुन्हा नवी ओळख करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याने या पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे रादेवबाबा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मात्र त्यांनी कोणतीही टीका केली नाही.

वेबदुनिया वर वाचा