जम्मू-काश्मीरात पुरात आतापर्यंत 200 पेक्षा जास्त जणांना प्राण गमवावे लागले आहेत. अद्याप दीड लाख लोक पुरात अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी हवाईदल, एडीआरएफचे जवान प्रयत्न करत आहे. अद्याप बचाव पथक अनेक भागात पोहोचलेले नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
नैसर्गिक संकटाने जम्मू काश्मीरमधील अनेक गावे वाहून गेली आहेत. अधूनमधून होणार्या पावसामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहे. पुराचा धोका कमी झाला असला तरी, पुरामुळे महामारी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.