दरम्यान, मृतदेह सापडण्याच्या या मालिकेमुळे भाजपा सरकार अडचणीत आले असून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना हटविण्याची आणि निष्पक्ष चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. राज्यपाल रामनरेश यादव यांना पदावरून हटवून चौकशीची मागणी करणारी याचिका विचारात घेण्याला सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविल्याने भाजपा सरकारला चांगलाच झटका बसण्याची शक्यता आहे.