माजी मंत्र्यांना शासकीय बंगले सोडण्याची नोटीस

शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (11:38 IST)
यूपीए सरकारमधील 16 माजी मंत्र्यांना शासकीय बंगले सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सगळ्यांवर बेकायदा राहत असल्याचाही ठपका आला आहे. माजी मंत्र्यांना नुकसान भरपाईपोटी 20.92 लाख रुपये दंड लावण्यात आला आहे. बंगले रिकामे करण्यासाठी त्यांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली.

माजी मंत्र्यांमध्ये फारूक अब्दुल्ला, कपिल सिब्बल, जयपाल रेड्डी, अजित सिंह, बेनीप्रसाद वर्मा, डॉ. गिरिजा व्यास, एम.एम. पल्लम राजू, कृष्णा तिरथ, श्रीकांत कुमार जेना, सचिन पायलट, जितेंद्र सिंह, प्रदीप जैन, पी. बलराम नाइक, किल्ली कृपाराणी, लालचंद कटारिया, माणिकराव गावित यांची नावे आहे. 

वेबदुनिया वर वाचा