ममतांच्या निर्णयावर टाटांचे मौन

सिंगुरमधील टाटा प्रकल्पाविरोधात सत्याग्रह करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आपले आंदोलन मागे घेण्याची घोषणा रविवारी केली असली तरी, या
विषयावर टाटांनी अजूनही मौन बाळगले आहे.

ममतांनी त्यांचा निर्णय घेतला असून, याविषयावर बोलण्यासारखे आमच्याकडे काहीही नसल्याचे मत टाटा मोटर्सच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे.

जोपर्यंत राज्यपालांनी गठित केलेल्या समितीचा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत सिंगुरमधील कारखान्यात काम बंदच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा