भूमीदानास अभिताभची हिरवी झेंडी

वेबदुनिया

सोमवार, 7 नोव्हेंबर 2011 (12:38 IST)
ND
महानायक अमिताभ बच्चन यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील ग्राम दौलतपूर येथील त्यांची जमीन ग्रामपंचायतीला दानस्वरूपात देण्यास हिरवी झेंडी दिली आहे. अमिताभ यांच्याद्वारे अधिकृत केलेल्या एका व्यक्तीने शनिवारी तहसील प्रशासनास एक पत्र देऊन आवश्यक ती कारवाई लवकर पूर्ण करण्याचा आग्रह केला.

अमिताभ यांचे मुखत्यार पत्र घेतलेल्या राजेश ऋषिकेश यादव यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे, की बच्चन यांची ग्राम दौलतपूरमधील भूमी सर्वे क्र. 711 व 793ला ग्राम पंचायत किंवा राज्य सरकार आपल्या स्वाधीन करून घ्यावे. अमिताभ यांनी आतापर्यंत या भूमीवर ताबा केला नसल्यामुळे त्यावर लोकांनी अतिक्रमण करण्याची शक्यता आहे.


वेबदुनिया वर वाचा