लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहंमद या तीनही संघटनांच्या म्होरक्यांची आयएसआयने एक बैठक बोलावली होती. भारतात दहशतवादी हल्ल्यांसाठी ३० दहशतवाद्यांची निवड करण्यात आली असून त्यांना पेशावर येथून नियंत्रण रेषेजवळ सोडण्यात आले आहे. मार्गात बर्फ जमा होण्यापूर्वी भारतात घुसण्याच्या सूचनाही आयएसआयने त्यांना दिल्या असल्याचे वृत्त आहे.