अमिताभ यांनी वर्ष 1969मध्ये चित्रपट 'सात हिंदुस्तानी'मधून आपल्या करियरची सुरुवात केली होती आणि आतापर्यंतचा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट 'षमिताभ' आहे. 'जंजीर', 'अभिमान', 'सौदागर', 'रोटी, कपड़ा और मकान', 'दीवार', 'शोले', 'डॉन', 'लावारिस', 'सत्ते पे सत्ता', 'नमक हलाल', 'कूली', 'आक्रोश', 'चीनी कम', 'निशब्द', 'सरकार राज', 'ब्लैक' और 'पा'सारख्या चित्रपटांमध्ये अमिताभच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली आहे. बिग बी लवकरच चित्रपट 'पीकू' आणि 'वजीर'मध्ये आपल्यासमोर येणार आहे.
दुसरीकडे संजय लीला भंसाळीने 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'ब्लैक', 'सांवरिया', 'गुजारिश' आणि 'गोलियों की रासलीला राम-लीला' सारखे आयकॉनिक चित्रपट बनवून प्रेक्षकांचा मनात घरे केले आहे. भंसाळी सध्या 'बाजीराव मस्तानी'च्या निर्दशनात व्यस्त आहे. त्याशिवाय पंडित मदनमोहन मालवीय यांना मरणोपरांत भारत रत्न पुरस्कार देण्यात आले.