फक्त लढाई जिंकली आहे!

वेबदुनिया

रविवार, 28 ऑगस्ट 2011 (11:47 IST)
आपल्या मागण्या मान्य करून त्यानुसार लोकपाल कायदा करण्याचे आश्वासन देणारे ठराव मंजूर करून लोकेच्छेचा आदर केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी सर्व संसद सदस्यांना धन्यवाद दिले व त्यांचे अभिनंदन केले. हा केवळ माझा विजय नाही तर गेले 12 दिवस अहोरात्र यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणा:या तमाम देशवासियांचा हा विजय आहे.

आज मिळालेला हा विजय मोठा असला तरी याने आपण फक्त अर्धी लढाई जिंकली आहे, असे सांगून अण्णांनी जनतेला वेळ येईल तेव्हा पुढील लढाईसाठीही तयार राहण्याची हाक दिली. हा विजय अवश्य सादर करा. अगदी मोठा विजयोत्सव करा पण आंदोलनाप्रमाणे हा विजयोत्सवही पूर्णपणे शांततेने साजरा करावा, असे त्यांनी आवाहन केले.

वेबदुनिया वर वाचा